कोल्हापूर | जिल्हा पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी पोलिस दलातील कामचुकार, बेशिस्त वर्तणुक करणाऱ्यांना मोठा दणका दिला असून पाच जणांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलिस दलातील कामात कुचराई, बेशिस्तपणा, गैरवर्तन, निष्काळजीपणासह नियमांचा भंग केल्यामुळे ही कारवाई करण्यात आलीय. यातील तिघा पोलिसांना थेट बडतर्फ करण्यात आल्याने त्यांची वर्दीच उतरली आहे. तर एका महिला पोलिसाला सक्तीने सेवानिवृत्ती आणि एकावर खात्यातून कमी करण्याची कारवाई केली आहे. एकाचवेळी पाच जणांवर झालेल्या कारवाईने जिल्हा पोलिस दलात खळबळ उडाली आहे.
कारवाई करण्यात आलेल्यांमध्ये – पोलिस नाईक – अमित दिलीप सुळगावकर, नारायण पांडुरंग गावडे, महादेव पांडुरंग रेपे (या तिघांना बडतर्फ), समीना दिलावर मुल्ला (सक्तीने सेवानिवृत्ती), आणि पोलिस नाईक संतोष हरी पाटील (खात्यातून कमी) यांचा समावेश आहे.